वेळ: २५ ते ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
>साहित्य:
१ कप वरी तांदूळ
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/२ कप भोपळ्याचे मध्यम तुकडे (साल काढून टाकावे)
१/२ कप बटाट्याचे तुकडे (बटाटा सोलून)
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ
साधारण ३ कप उकळते पाणी
कृती:
१) जाड बुडाच्या पातेल्यात वरी तांदूळ थोडे भाजून घ्यावे, म्हणजे भात हलका होतो. तांदूळ एका भांड्यात तात्पुरता काढून ठेवावेत.
२) त्याच पातेल्यात तूप गरम करावे त्यात जिरे आणि मिरच्या घालून परतावे. गॅस मध्यम ठेवावा. बटाट्याच्या फोडी घालून एक वाफ काढावी. बटाटा जवळजवळ शिजला कि त्यात वरी तांदूळ घालावेत.
३) मिक्स करून त्यात गरम पाणी घालावे. मिठ घालावे. एक दोन मिनीटांनी भोपळ्याच्या पातळ फोडी आणि दाण्याचा कूट घालावा. मध्यम आचेवर वाफ काढावी.
गरमागरम वरीचा पुलाव दाण्याच्या आमटीबरोबर किंवा फोडणीच्या ताकाबरोबर सर्व्ह करावा.
0 comments:
Post a Comment